“राऊत गेले, आता परबांची बारी”; रवी राणांचे सूचक वक्तव्य

89

शिवसेना नेते संजय राऊत यांना 31 ऑगस्टला 17 तासांच्या चौकशीनंतर, ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसेच, राऊत गेले आता परबांची बारी,असे सूचक वक्तव्य देखील केले आहे.

आता परबांची बारी

संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर, रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावे लागेल, असे रवी राणा यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: “राऊतांच्या घरात शिंदेंच्या नावाने सापडलेले ते 10 लाख म्हणजे”…केसरकरांची धक्कादायक प्रतिक्रिया )

न्यायालयात हजर करणार

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने ही कारवाई केली आहे. सोमवारी सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर संजय राऊत यांनी ईडीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.