आजचा दिवस हिंदूंसाठी काळा दिवस! संजय राऊतांची मनसेवर टीका

84
मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सरकारकडे गुप्तचर खात्याचा अहवाल आला आहे. त्यात शिर्डी, त्रंबकेश्वर येथे सकाळी काकड आरती होती. त्यासाठी मंदिरामध्ये कमी गर्दी असते, मंदिराच्या आसपास हजारो भाविक उभे असतात, बुधवारी, ४ मे रोजी आज काकड आरती लाऊड स्पीकरवर झाली नाही, त्यामुळे लाखो भक्तांना आनंद घेता आला नाही. भाजपने त्यांच्या उपवस्त्राच्या साहाय्याने हिंदूंचा गळा घोटाळा. तेथील हजारो भक्तांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. हिंदुत्वासाठी हा काळा दिवस ठरला, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

राज ठाकरे हिंदूंमध्ये फूट पडतात 

आता या भोंग्यांच्या मुद्द्यावर हिंदूच रस्त्यावर उतरतील, हे दुर्दैवी आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच हजारो मशिदींवरील भोंग्यांमधून अजान झालेच नाही, असे म्हटले आहे. मात्र हिंदू मंदिरांना त्याचा फटका बसला आहे. मशिदींवरील भोंग्यांवर काय करायचे यावर एखादा व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. तो कायदेशीर मुद्दा आहे. हे भाजपचे कारस्थान आहे, त्यांनी राज ठाकरे यांचा बळी दिला आहे. भाजप कायम छोट्या छोट्या पक्षांचा यासाठी वापर करून घेते. मशिदींवर अनधिकृत भोंग्यांबाबतचा मुद्दा कायद्याचा आहे. हे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहे. आज रात्री ग्रामीण भागात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. संध्याकाळी भजनासाठी परवानग्या मागितल्या आहेत, त्यांची या नव हिंदुत्ववाद्यांमुळे अडचण निर्माण झाली आहे. भाजप राज ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदू-हिंदू मध्ये फूट पाडत आहेत,असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.