भाजप, महाविकास आघाडीची बेरीज-वजाबाकी; किती येणार, किती जाणार?

156

राजकारण म्हटलं की तेथे सत्तेचं गणित जमवण्यासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सतत होत असतात. राज्यातील राजकारणात सुद्धा सध्या अशीच बेरीज-वजाबाकी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार संपर्कात असल्याचे सांगत मोठा गौप्यस्फोट केला. यावर आता राजकीय चर्चा रंगल्या असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दानवेंना प्रत्त्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः सुप्रिया ताईंचा आनंदच न्यारा)

तुमच्या 25 तर आमच्या संपर्कात 50

रावसाहेब दानवे यांना मी जितके ओळखतो तितके ते भांग पीत नाहीत किंवा इतर कुठलीही नशा करत नाहीत. दानवेंना कदाचित 125 म्हणायचं असेल, स्लिप ऑफ टंगमुळे ते 25 म्हणाले असतील. आणि जर तुमच्या संपर्कात आमदार असतील तर घेऊन जा, थांबलात कशाला?, होळी संपली आहे. तुमच्या संपर्कात 25 असतील तर आमच्या संपर्कात भाजपचे 50 आमदार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी दानवेंच्या विधानाला प्रत्त्युत्तर देताना केला आहे.

(हेही वाचाः आधी सिद्ध करा, मगच महाविकास आघाडीत या! असे कोणाला म्हणाले जयंत पाटील?)

काय म्हणाले होते दानवे?

राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. पण शिवसेनेने जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात येऊन, त्यांनी हिरव्याचं पांघरुण पांघरुन घेतलं आहे. त्यामुळे शिवसेना आता हिरव्याचं समर्थन करत असल्याचे सांगत, महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. इतकंच नाही तर हे आमदार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर देखील बहिष्कार घालणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. पण निवडणुका जवळ येताच हे 25 आमदार नक्कीच भाजपमध्ये येतील, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.