सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

76

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना, उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. विजय आपलाच होईल, आई भवानीवर विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कितीही अफजल खान आले तरीही घाबरणार नाही, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

( हेही वाचा: विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले कारण )

सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्रात

मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे. कारण कैलासने काय केले हे सर्वांना माहिती आहे. ओमराजेदेखील कसा रक्त पोळतोय हे तुम्हीदेखील बघितले आहे. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते. जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

जर शिवसैनिक बोलले असते तर मेळावा इथेच झाला असता

मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाही. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून  शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मेळावा इथेच झाला असता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.