Sharad Pawar : ईडीच्या कारवाईमुळे काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला – शरद पवार

158
Sharad Pawar : ईडीच्या कारवाईमुळे काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला - शरद पवार

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीदेखील आपल्या पक्षातून (Sharad Pawar) बंड करत स्वःताचा नवीन मार्ग निवडला. तेव्हापासून सतत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होतांना दिसून येत आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सतत आरोप – प्रत्यारोप सुरु असतात. अशातच आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “ईडीच्या कारवाईमुळे काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला”, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीका केली. रविवार २० ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमामधून ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला. आज ते भाजपकडे गेले. परंतु ते आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच (Sharad Pawar) असल्याचे सांगतात. त्यांची वैचारिक भूमिका बदललेली नाही. फक्त तिकडे ‘आत’ जावे लागू नये, म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. मात्र राजकारणात सत्याची कास सोडून जाणाऱ्यांना जनता भविष्यात वेगळी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. या शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना)

सरकारने चांगले काम करण्याची संधी गमावली

“गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील किती उद्योग-कारखाने गुजरात आणि इतर राज्यात गेले? तुम्ही गुजरातमध्ये कारखाने जरूर काढा. परंतु महाराष्ट्रात येणारे कारखाने येथून अन्य राज्यात नेले. त्यामुळे राज्य सरकारने चांगले काम करण्याची संधी गमावली आहे.’’ अशा भाषेत त्यांनी (Sharad Pawar) सरकारवर टीका केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.