मागच्या अडीच वर्षांत जी कामे झाली नाहीत ती 5 महिन्यांत झाली; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना टोला

89

राज्यातील शेतक-यांची, कष्टक-यांची, दीनदुबळ्यांची असतील या सगळ्यांची कामे गेल्या अडीच वर्षांत झाली नाहीत, ती आता या पाच महिन्यांत झाली आहेत, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. राज्यातील जी कामे गेल्या अडीच वर्षांत झाली नव्हती, त्या कामांना आता वेग आला आहे. गोरगरीबांची आणि शेतक-यांची कामे गतीने होत असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधताना मातोश्रीचा उल्लेख केला आहे. शिंदे म्हणाले की मागच्या अडीच वर्षांत मातोश्रीची दारे सगळ्यांसाठी बंद होती, मात्र आता मातोश्रीची सगळी दारे सगळ्यांसाठी खुली आहेत. आधी मंत्री खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र, आता आमदार, खासदारांपासून जनसामान्यांपर्यंत मातोश्रीची दारे खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

( हेही वाचा: मविआच्या काळात कौशल्य विकास केंद्राची जमीन ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला आंदण )

सगळ्यांची सकाळ कोण खराब करतो?

शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आता राज्यातील सगळ्यांना माहिती आहे की, सगळ्यांची सकाळ कोण खराब करतो, असा टोला लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.