एका माणसासाठी ठाकरेंनी शिवसेना पणाला लावली; कृपाल तुमानेंचा टोला

90

उद्धव ठाकरे यांनी एका माणसासाठी पक्ष पणाला लावला, पण अजुनही वेळ गेलेली नाही असा टोला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे.

आमचे 40 आमदार आणि आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे सांगत होतो. पण ते त्यासाठी तयार नव्हते. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. एका माणसासाठी त्यांनी पक्ष पणाला लावला, असे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

( हेही वाचा: शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आपण दु:खी होतो; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य )

काय म्हणाले कृपाल तुमाने 

आज शिवसेनेची काय स्थिती आहे, हे सर्व जण पाहत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आताही हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर चित्र बदलू शकते, असेही तुमाने यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत निवडणूक लढलो होतो आणि आता आम्ही शिवसेनेमध्येत आहोत, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.