Patra Chawl Case: ईडीकडून ४ हजार पानी आरोपपत्र दाखल, संजय राऊतच दोषी

135

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळाला नसून राऊत यांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं बाळ झालं पोरकं! महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू)

दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. सोमवारी संजय राऊतांवर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीने राऊतांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, अशा प्रकारचा आरोप या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूसह संगनमत करून राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणातील प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचेही म्हटले आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आल्याचा उल्लेख या आरोप पत्रात करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.