आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतात; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

112

14 मार्चला सरकार पडणार असल्याची टीका विरोधकांनी केली.अजित पवारांसह आदित्य ठाकरे यांनी देखील हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे म्हटले आहे. आता त्यावर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आमच्यापैकी एकानेही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितलेला नाही. गद्दारी कशाला म्हणतात? जर आपण आपली तत्व सोडली तर त्याला गद्दारी म्हणतात. ती गद्दारी कोणी केली? तत्त्व कोणी सोडली आहेत. आम्ही नाही सोडली पण आम्ही कधी त्यांना गद्दार म्हटलेले नाही, असे दीपक केसरकर म्हणाले.

( हेही वाचा: सदा सरवणकरांना गोळीबार प्रकरणात पोलिसांची क्लीन चीट )

आदित्य ठाकरे त्याचा फायदा घेतात

आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आदर असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही. त्याचा गैरफायदा आदित्य ठाकरे घेत आहेत. वाट्टेल ते बोलत चालले आहेत. योग्य वेळी त्यांना उत्तर देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल, असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.