योगी आणि भोगीबाबत मतपरिवर्तन कसे झाले? हा संशोधनाचा विषय! राऊतांचा राज ठाकरेंना टोला

92

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल केला आहे. योगी आणि भोगी यांच्याबाबत राज ठाकरेंचे मतपरिवर्तन कसे झाले?  हा संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना, राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि राणा दाम्पत्य यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.

यावर पीएचडी करायला हवी

भोंग्यांबाबत न्यायालयाची जी भूमिका आहे. तीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते. भोंग्यांचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही राजकीय भोंगेबाजी आहे, असे म्हणत आता योगी कोण? भोगी कोण? हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसे झाले. हा संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्याने त्यावर पीएचडी करायली हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे. अशी खोचक टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

इतर राज्यांना मिळतेय  सावत्र वागणूक

पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे प्रधानमंत्री असतात. ज्या राज्यात आपल्या पक्षाचे सरकार नाही, त्या राज्याच्या बाबतीत पंतप्रधानांनी अधिक संवेदनशील असायला हवे. पण, तसे होताना दिसत नाही. झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यांना सावत्र वागणूक मिळते, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

( हेही वाचा: Phone Tapping Case: ‘या’ नावांनी राऊत आणि खडसेंचे फोन टॅप केले जात होते ACPची खळबळजनक साक्ष )

सरसंघचालकांच्या विधानाचे समर्थन

कोणताही समाज हिंसेचा आधार घेत असेल, तर समाज अधोगतीला जातो. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. भागवतांचे अभिनंदन करतो. त्यांनी हा विषय पुढे आणला. देशात त्यावर विचार व्हावा. यावर मंथन व्हायला हवे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.