एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची नरमाईची भूमिका म्हणाले…

77

राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना, नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे हे अजूनही शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांनीच त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आणि सहकारी आहेत. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी मनात अजिबात राग नाही. गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत येत नाहीत तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

उद्धव ठाकरेंना जनतेचा  पाठिंबा 

11 जुलैनंतर, आमच्या मागणीवर विचार होईल. गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत येत नाही, तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. राज्यातील लोकभावना तीव्र आहेत. अकोल्यात 26 हजार लोकं सोमवारी रस्त्यावर होती. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला जात आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा ‘मविआ’ सरकार टिकणार? उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत ‘फोन पे चर्चा’! )

या डबक्यात फडणवीसांनी उतरु नये

राजकारणात काही लोकांनी डबक तयार केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने स्वत: त्या डबक्यात उतरु नये. कारण तसे काही केले तर फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल, असे माझे स्पष्ट आणि परखड मत आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. राऊत म्हणाले की, ते या डबक्यात आणि नरकात उडी मारणार नाहीत. सध्या डबक तयार झाले आहे. त्या डबक्यामध्ये स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणणा-या मोदींचे नेतृत्त्व सांगणा-या पक्षाने त्या डबक्यात उतरु नये. देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता आहे. ते डबक्यात उतरणार नाहीत, अशी मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.