ना गांधी ना पवार संजय राऊत म्हणतात पंतप्रधान पदासाठी ठाकरेंचा चेहरा

122

उद्धव ठाकरे यांनी राज्यात दोन्ही काँग्रेससोबत सरकार चालवले, ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत आहेत. सध्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप विरोधी सर्व पक्ष आता एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे महत्वाचा चेहरा असतील, मात्र ही एकजूट काँग्रेसशिवाय शक्य नाही. या एकजुटीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोणता असेल याचा विचार आता करण्याची गरज नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहे, त्यांना राज्य सरकार चालवण्याचा अनुभव आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.  राऊतांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मनातील विचार ओठावर आले, याआधीही राऊत यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करतील, असे वक्तव्य केले होते. मात्र पुन्हा असे वक्तव्य केल्यामुळे राऊत पंतप्रधान पदासाठी शरद पवार किंवा राहुल गांधी यांचा चेहरा महत्वाचा वाटत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाविकास आघाडीने ठरवले होते की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करु. विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेवटी या देशातील मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येते. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा चंदेरी गडावर शिवरायांच्या ८५ किलो मूर्तीची केली स्थापना; शिवप्रेमींच्या भगीरथ प्रयत्नांना यश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.