शिखांमध्ये पसरतोय’ लव्ह जिहाद’! खलिस्तानींच्या आडून भारतीय शीख लक्ष्य! 

शीख तरुणींचे अपहरण झाल्याने काश्मिरात संताप उसळला आहे. केंद्र सरकारने शांती प्रक्रियेला अनुसरून जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय पातळीवर प्रयत्न सुरु करताच आधी ड्रोनच्या माध्यमातून बाँम्ब हल्ले झाले, त्यानंतर शीख तरुणींचे अपहरण झाले. या सर्वांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे प्रमाण मिळत आहे. 

123

विदेशात बसून खलिस्तानी ज्या पाकड्यांच्या तुकड्यावर जगत भारताच्या विरोधात ‘के-२’ चा नारा देत आहेत. त्यांची हवा काश्मीरमध्ये निघाली आहे. इथे श्रीनगरमध्ये दोन शीख तरुणींचे अपहरण करून दोघींचा निकाह (विवाह) वयस्क मुसलमानांसोबत लावून देण्यात आला आहे.

भारताच्या विरुद्ध षडयंत्र रचणारे खलिस्तानी दहशतवादी सध्या पाकड्यांच्या आश्रयाखाली वाढत आहेत. ते शिखांचे जनमत मिळवण्याच्या बाता मारतात. शिखांच्या अन्यायाविरूद्ध आकंडतांड्व करतात. मात्र त्यांचे दावे हे किती फोल आहेत, त्याचा भांडाफोड श्रीनगरमध्ये झाला आहे. जेथे शीख तरुणींचे अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून वयस्क मुसलमानांसोबत त्यांचा विवाह लावून देण्यात आला.

शीख समाजात संतापाची लाट! 

शीख समाजाच्या तरुणींचे दिवसाढवळ्या अपहरण केल्याने या समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी श्रीनगरमध्ये निदर्शने केली. त्यानंतर राज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक जाहिरात दिली. त्या दरम्यान एक तरुणी रविवारी रात्री उशिरा परतली. मात्र दुसरी तरुणी अद्याप त्या मुसलमानांच्या ताब्यात आहे. शीख समाज पोलिसांवर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप लावत आहे. त्यांनी मुसलमान आरोपींना पोलिस साहाय्य करत असल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा : भारतविरोधी दहशतवादी संघटनांचे विध्वंसक ‘कारनामे’!)

या दरम्यान शिखांच्या धार्मिक संस्थान नियंत्रण संस्थेचा भाग असलेले ‘दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’चे मनजींदर सिंह सिरसा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असता गृहमंत्र्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘के-२’ ची हवा निघाली!! 

दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसलेले किसान युनियनचे लोक हे सर्वाधिक हिंदू शीख आहेत. या ठिकाणी नेत्यांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यांच्यावर शीख – मुसलमान एकतेचा विचार बिंबवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या प्रचारावर विदेशात बसलेले खलिस्तानी नियंत्रण ठेवत आहेत. हे खलिस्तानींच्या ‘के-२’ षडयंत्राचा भाग आहे. ज्यामध्ये ‘के-२’ अर्थात ‘खलिस्तानी आणि काश्मीर’ याची हवा काश्मीरमध्ये काढण्यात आली आहे. तिथे शिखांच्या दोन तरुणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले गेले. त्यानंतर त्यांचा विवाह वयस्क मुसलमानांसोबत लावून देण्यात आला.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

हिंदू धर्मियांचाही विरोध 

या घटनेच्या विरोधात हिंदू धर्मीयदेखील रस्त्यावर उतरले आहेत. ज्यामध्ये अशा अनेक संघटना आहेत, ज्यांनी केंद्र सरकारवर काश्मीरात इस्लामी पक्षांना अधिक सन्मान दिला जात असल्याचा विरोध केला जात आहे.

यामध्ये एक ट्विट प्रोफेसर हरि ओम यांचा आहे. ज्यांच्यावर आरोप केला जात आहे कि, चार शीख तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. मात्र अद्याप तरी २ तरुणींचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह करण्यात आल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा : किसान युनियन आंदोलन बनले गुन्हेगारांचा अड्डा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.