वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांनी हिंसाचार सुरु केला आहे, हिंदूंना लक्ष्य करत आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू करणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केल्यामुळे मुसलमानांचा उन्माद वाढला आहे. त्यामुळे मुसलमानांनी मुर्शिदाबादमध्ये (Murshidabad) हिंसाचार माजवला. आता या मुर्शिदाबादमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी सध्या नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
(हेही वाचा Murshidabad Violence नंतर मानवाधिकारवाल्यांच्या वॉलवर शुकशुकाट)
या पथकामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गुप्तचर शाखा), दोन उपअधीक्षक – एक दहशतवाद विरोधी दल (CIF) आणि दुसरा गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पाच निरीक्षक तसेच इतर अधिकारी यांचा समावेश आहे. मुर्शिदाबाद (Murshidabad) येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास सध्या सुरु आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे इस्लामिक धर्मगुरूंची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी मुर्शिदाबाद हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. मुर्शिदाबादमधील (Murshidabad) हिंसाचारानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफच्या अनेक तुकड्या तैनात केल्या. अशी माहिती आहे की, आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली असून मुर्शिदाबादच्या समसेरगंज, धुलियान आणि इतर प्रभावित भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community