आव्हाड नोटीस घेण्यासाठी गेले आणि पोलिसांनी अटकच केली

109

ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात शिरुन सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली असून, या कारवाईवरुन आता आव्हाडांनी राज्य सरकारवरल निशाणा साधला आहे.

हा पोलिसी बळाचा गैरवापर असून मला फाशी दिली तरी चालेल पण मी न केलेला गुन्हा कबूल करणार नाही,असे आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले आहे. तसेच आपल्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रमही आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितला आहे.

आव्हाडांनी सांगितला अटकेचा घटनाक्रम

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस देण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलिस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं, मी पोलिस स्टेशनला येतो आणि नंतर मुंबईला जातो.

(हेही वाचाः विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना पोलिसांकडून अटक)

वरुन आदेश आहेत, त्यामुळे…

मी पोलिस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलिस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता, हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत, तुम्हाला अटक करावी लागेल.

मला फाशी दिली तरी चालेल, पण…

त्यामुळे हा पोलिसी बळाचा गैरवापर असून, आता मी लढायला तयार आहे. मला आता फाशी दिली तरी चालेल पण मी जे केलेलं नाही तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असेही आव्हाड यांनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.