१२ आमदारांचे निलंबन न्यायालयात कायम, काय म्हणाले मलिक?

96
भाजप आमदारांनी निलंबनाला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र निलंबनावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप या देशात संविधानिक पदावर आणि संस्थेच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करतेय, असा थेट आरोप मलिक यांनी केला.

आता तरी भाजपला संविधानिक संस्थेचे महत्त्व कळले पाहिजे

विधानसभेत कुठलाही आमदार गैरवर्तन करत असेल, तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो, असे असताना त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता, मात्र न्यायालयाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजप आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संविधानिक संस्थेचे महत्त्व कळले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या भाजप आमदारांना न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे न्याय मागण्याचे आदेश देत स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.