शेवटपर्यंत प्रयत्न, तरी राष्ट्रवादीला ‘ती’ दोन मते मिळाली नाहीच

83

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ काही मिनिटं शिल्लक असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधआन परिषदेच्या निवडणुकीतही मलिक आणि देशमुख यांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाही.

न्यायालयाचा निकाल

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मतदानाला परवानगी दिली तर नवाब मलिक आणि अनेल देशमुख मतदानासाठी विधान भवनात जाणार का, असा सवाल निकालाआधी सर्वोच्च न्यायालयाने या दोघांच्या वकिलांना केला होता. त्यामुळे मलिक आणि देशमुखांना मतदानासाठी परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची मते या निवडणुकीतही कमी झाली आहेत.

मतदान करण्याचा संविधानिक अधिकार जरी असला तरी आम्ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी परवानगी देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात आपण कुठलाही बदल करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.