सुशीलकुमार शिंदे यांनी केले Veer Savarkar यांचे कौतुक

125

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अलीकडेच काँग्रेसच्या विचारधारेला न जुमानता वीर सावरकर यांचे कौतुक केले. वीर सावरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जे अस्पृश्यताविरोधी कार्य केले, त्याचे कौतुक केले. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सुशीलकुमार शिंदे यांनी सन्मानपूर्वक उल्लेख केला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, वीर सावरकर यांनी अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी केलेल्या कामाचा मी कायमच आदर केला आहे. त्यांनी पतीतपावन मंदिर बनवताना एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीकडून त्याची पायाभरणी केली होती. अस्पृश्यता समाप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे असे सावरकर (Veer Savarkar) यांचे मानणे होते.

(हेही वाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची; Sushilkumar Shinde यांच्या वक्तव्याने काँग्रेसची गोची)

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून भारतीय जनता पार्टीला कायमच लक्ष्य केले जाते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सावरकर यांच्यावर आरोपच केले आहेत. या स्थितीत काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने सावरकरांबाबत असे विधान करणे महत्त्वाचे मानले जात आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरच्या लाल चौकात जाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचीही चर्चा सुरू आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ते म्हणाले होते की, जेव्हा मी गृहमंत्री होतो तेव्हा काश्मीरमध्ये जाताना घाबरत होतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.