पाकिस्तान्यांचे ट्विट, त्यांना आता काश्मीर नको, विराट पाहिजे!

155

T20  विश्वकप क्रिकेट सामान्यांतील भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला सामना रोमहर्षक झाला. यात अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याची रंजकता वाढलेली होती. हा सामना विराट कोहलीमुळे भारताने जिंकला, मात्र या सामान्यामुळे पाकिस्तान्यांची मने दुखावली आहेत. आता पाकिस्तान्यांना काश्मीर नको तर विराट कोहली पाहिजे आहे. तशा आशयाचे बॅनर पाकिस्तानी हातात झळकावत आहेत. सोशल मीडियामध्ये यावरून जोरदार विनोद होऊ लागली आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल 

पाकिस्तान्यांनी ट्विट करत हातात फलक झळकावला आहे. त्यामध्ये पाकिस्तानी म्हणतात की, ‘आम्हा काश्मीर नको, आम्हाला विराट कोहली द्या’. हे ट्विट लेफ्ट. जन. विनोद भाटिया यांनी केल्यामुळे याविषयी सत्यता दिसून येत आहे. मात्र यामुळे सोशल मीडियात जोरदार उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान्यांची ‘आम्हाला अमुक एक हवे, तमुक एक हवे’, ही मानसिकता भिक्षुकाची आहे, असेच दिसत आहे. यात भूषण यांनी ‘भिकारी आणखी काय करू शकतो?’, अशी विचारणा केली आहे.

मुकुल यांनी ‘दुसऱ्यांच्या वस्तू मागायच्या, याच्याशिवाय दुसरे काय काम आहे पाकिस्तानकडे?’, असे विचारले आहे.

तर अंशुमन म्हणतात, ही सवय तर पाकिस्तानच्या जन्मापासूनची आहे, ती सहजासहजी नाही जाणार. अशा प्रकारे हजारो रिप्लाय या ट्विटला आले आहेत.

(हेही वाचा फटाके वाजवल्याने मुसलमान वैतागले, मनसेने सुनावले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.