स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ‘या’ क्रांतीकारकांचे स्मरण करण्याची ही वेळ; पंतप्रधानांनी जागवल्या स्वातंत्र्यलढ्यातील आठवणी

89

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन नागरिकांशी संवाद साधताना, स्वांतत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे स्मरण केले. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरुन जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 15 ऑगस्ट हा दिवस महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र आणि बापू यांचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे, पंतप्रधान म्हणाले.

( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मध्यरात्री केले ध्वजारोहण; शेकडो ठाणेकर उपस्थित )

महापुरुषांचे स्मरण करण्याचा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधी, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर, वि.दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच, देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करुन आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे. देशाने 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.