लव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच!

109

हिंदू संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्या वादाचा मुस्लिम धर्मांध शक्ती गैरफायदा घेऊ लागल्या आहेत. हा समाज घटक हिंदू धर्मातील मुलींना खोटी आमिषे दाखवून किंवा भासमान सुखाची स्वप्ने दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. ही मोडस ऑपरेंडी ‘लव्ह जिहाद’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. स्वतंत्र भारतात हिंदू धर्मातील ब्राह्मण, मराठा, माळी अशा अठरा पगड जातीच्या महिला-मुली असोत किंवा दलित, जैन अशा पंथातील मुली असो सर्वांना हे जिहादी मुसलमान युवक फूस लावून त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि शेवटी त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करतात.

जिहादींची लोकसंख्या वाढीचे षडयंत्र

लव्ह जिहादच्या षडयंत्रामागे मोठी आर्थिक यंत्रणा जिहादी प्रवृत्तीकडून लावली जाते, याची चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील झाली. लव्ह जिहादी तरुणांना पैसा, मोटार सायकल, मोबाइल पुरवले जातात. कारण एका लव्ह जिहाद प्रकरणामध्ये संबंधित हिंदू मुलीच्या कुटुंबाची आणि नातेवाईकांची बदनामी होते. कारण हिंदू परिवाराची इज्जत ही कुटुंबातील स्त्रीच्या अब्रूशी जोडलेली असते. त्यामुळे हा सरळ मारा हिंदू कुटुंबांचा इज्जतीवर होतो. तसेच धर्मांतर केल्यावर हिंदू कुटुंबातून एक हिंदू व्यक्ती कमी होते व त्या मुलीला भविष्यात होणारे चार ते पाच मुले मुसलमान धर्माचे बनतात. हा हिंदूंचा एकप्रकारे वंशविच्छेदच आहे आणि जिहादींची लोकसंख्या वाढीचे षडयंत्र आहे.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’?)

हिंदू मुलींमध्ये स्वधर्माचा अभिमान नाही

लव्ह जिहादच्या बऱ्याच घटना सध्या समोर येत आहेत. याविषयाची सर्व माहिती सध्या युट्यूब आणि गुगलवर उपलब्ध आहे. पोलीस सर्वेक्षणातूनही ही माहिती मिळत आहे. दुर्दैवाने याला जबाबदार हिंदूंच आहेत, कारण सध्या हिंदूंना स्वतःच्या धर्माचे महत्व वाटत नाही. धर्माचा अभिमान नाही. परिणामी हिंदू मुली जिहादी धर्मांध मुलांकडे आकर्षित होतात, हा इतिहास आहे. आधीच हिंदू धर्मावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा मोठ्या प्रमाणावर आहे. एका बाजूला हिंदू धर्मातील मुलींवर पाश्चिमात्य संस्कृती कॉन्व्हेंट सारख्या शाळांच्या माध्यमातून लादली जात आहे आणि दुसरीकडे धर्मांध मुसलमानांच्या दिखाऊपणाकडे हिंदू मुली आकर्षित होत आहेत. त्यामुळे मुसलमान युवकांचे ‘लव्ह जिहाद’ सारखे मनसुबे दिवसेंदिवस साध्य होत आहेत. आज जर हिंदू सनातन धर्मातील मुलींचे डोळे उघडले नाही, तर येणारा काळ हा हिंदू मुलींनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी यातनादायी असेल. कारण हिंदू धर्मा इतका मान-सन्मान, आदर, अधिकार, स्वातंत्र्य हे मुस्लिम धर्मासह अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना मिळत नाही. तरीही हिंदू मुली लव्ह जिहादच्या विळख्यात सापडतात.

(हेही वाचा इस्लामी अर्थव्यवस्थेसाठी ‘हलाल’ चा विस्तार!)

काळ्या विद्येचा वापर

अशा परिस्थितीत आम्ही ‘लव्ह जिहाद’ची बरीच प्रकरणे हाताळली आहेत. जेव्हा मुस्लिम धर्मांध मुलगा हा हिंदू मुलीला पळवून नेतो, तेव्हा आमची संघटना आमच्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून तिला शोधून काढते, त्यासाठी प्रशासनाची मदत घेतो. मात्र जेव्हा हिंदू मुलीला पोलीस ठाण्यात आणले जाते, तेव्हा मात्र ती मुलगी स्वतःचे आई-वडील, भावंड यांना ओळखत नाही, ज्या मुलीला हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेशिवाय कोणत्याही भाषेचे ज्ञान अवगत नसते, ती मुलगी चक्क उर्दू भाषा बोलायला लागते. त्या मुलींमध्ये हा बदल काळ्या विद्येचा वापर केल्यामुळे होतो, हे समोर आले आहे.

हिंदू मुली कशा फसतात?

हिंदू मुली मुसलमान तरुणांच्या विळख्यात का सापडतात, यावर आता विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम मुले हिंदू मुलींना स्वतःची हिंदू नावे सांगतात आणि सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टेलिग्राम), मोबाईल रिचार्ज सेंटर, युनिसेक्स हेअर कटिंग सलून, आधार कार्ड – पॅनकार्ड सेंटर या माध्यमातून हिंदू मुलींचे संपर्क क्रमांक मिळवतात, त्यांची ओळख करतात, त्यांच्याशी मैत्री करतात, त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. जर सर्व प्रयत्न करूनही मुलगी जाळ्यात सापडत नसेल तर तिला काळ्या विद्येचा वापर करून वश करतात. हे कुणाला पटो अथवा ना पटो, पण हेच त्रिवार सत्य आहे.

(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)

देशपातळीवर निर्णय घेण्याची गरज

  • खरेतर या विषयावर घराघरात जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना, शाळकरी-महाविद्यालयीन मुलींना याची वस्तुस्थिती सांगणे गरजेचे आहे.
  • यात मुलींमध्ये मुस्लिम द्वेष पसरवणे हा अजिबात हेतू नाही. पण जे धर्मांध मुस्लिम आहेत, त्यांना ठेचण्यासाठी आपण प्रत्येक बाजूने सक्षम असणे गरजेचे आहे.
  • तसेच याविषयावर सरकारी पातळीवरही धोरण ठरवण्याची गरज आहे. देशपातळीवर याविषयावर कडक कायदा करण्याची गरज आहे.
  • याकरता लव्ह जिहादची प्रकरणे बाहेर काढून हिंदू मुलींची सोडवणूक करणारे महाराष्ट्रातील धर्माभिमानी हिंदू तरुण, त्यांच्या संघटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची मागणी करणार आहेत.

(लेखक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अंबिकानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत.)

(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.