श्रद्धाने दिलेल्या पत्रावर कारवाई का झाली नाही?, पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

88

श्रद्धा वालकर हत्याकांडात बुधवारी एक मोठी माहिती समोर आली. श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिसांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी तेव्हाच या पत्राची गंभीर दखल घेतली असती तर आज श्रद्धा वाचली असती, अशा चर्चा सुरू असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

…म्हणून कारवाई केली नाही

श्रद्धाने नोव्हेंबर 2020 मध्ये नालासोपाराच्या तुळींज पोलिसांना पत्र लिहून आफताबपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. तसेच आफताब आपल्याला ठार करुन आपले तुकडे-तुकडे करणार असल्याची भीतीही तिने याच पत्रातून व्यक्त केली होती. पण नंतर आफताबच्या आई-वडिलांनी श्रद्धाची माफी मागितल्यानंतर श्रद्धाचे मतपरिवर्तन झाले आणि तिने आपली तक्रार मागे घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी पुढे कोणतीही कारवाई केली नसल्याचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.

(हेही वाचाः ‘श्रद्धाचं आडनाव वालकर होतं म्हणून की तो आफताब होता म्हणून? तत्कालीन सरकार गप्प का होतं?’, शेलारांचा सवाल)

पत्रावरुन तत्कालीन सरकार प्रश्नचिन्ह

दरम्यान, या पत्रावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावेळी पत्रावर कारवाई का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावरुन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात तत्कालीन सरकारच्या पक्षांच्या लागेबंध्यांचा संबंध आहे का? याची चौकशी करण्याची मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.