कुठल्याही क्षणी UBT गटाचा Congress सोबत काडीमोड होऊ शकतो; भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा दावा

72
कुठल्याही क्षणी UBT गटाचा Congress सोबत काडीमोड होऊ शकतो; भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा दावा
कुठल्याही क्षणी UBT गटाचा Congress सोबत काडीमोड होऊ शकतो; भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा दावा

विधानसभा जागा वाटपावरून मविआत नाराजीनाट्याला सुरूवात होणे हाच खर्‍या अर्थाने मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू होणे, असे असून दुसर्‍या टप्प्यात कदाचित धुसफूस चव्हाट्यावर येऊन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही क्षणी राजकीय भूकंप होवू शकतो. कारण विदर्भात ठाकरे गटाने (UBT) पाय ठेवू नये, याचे पूर्णत: प्लॅनिंग काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. पटोले आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात सुरू झालेले तु-तु-मै-मै भुकंपाचा पहिला अंक असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केला. जागावाटपावरून विदर्भाची चर्चा बैठकीतून उठून बाहेर पडण्यापर्यंत जेव्हा जाते तेव्हा प्रदेश काँग्रेसला ठाकरे गट नको असल्याचे सिद्ध होत असल्याचीही टीकाही राम कुलकर्णी यांनी केली.

(हेही वाचा – Irani Cup 2024 : सर्फराझ, यश दयाल व ध्रुव जुरेल भारतीय संघातून मुक्त, इराणी चषक खेळणार)

तीन घटक पक्षात अंतर्गत प्रचंड नाराजी

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सहभागी असलेल्या प्रमुख तीन घटक पक्षात अंतर्गत प्रचंड नाराजी असून या मंडळींनी विधानसभा निवडणूक पूर्वरंगात सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी खोटे-नाटे आरोप करत प्लॅनिंग केली असली, तरी निवडणुकीला प्रत्यक्ष सामोरे जातांना जागावाटप हाच खराखुरा प्रत्येकाच्या युगोचा आहे. लोकसभा निवडणुकीचं श्रेय शरद पवारांसह उद्धव ठाकरे स्वत:कडे जास्त घेत असल्याने आणि काँग्रेसवाले आमच्यामुळेच राज्यात मविआला यश मिळत असल्याचा दावा करत असल्याने सुरू झालेली अंतर्गत तु-तु-मै त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. एक तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी त्यासाठी प्रदेश काँग्रेसला विश्वासात न घेता संजय राऊत दुतामार्फत थेट राहुल गांधी यांच्याशी सलगी वाढवल्याचं चित्र सहा महिन्यापासुन समोर आलं असुन काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना सहन न होण्या पलीकडचं वाटतं. अर्थात शरद पवारांना देखील ते रूचणार नाही तो भाग वेगळा. विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी ही मंडळी एकत्र बसली असताना पटोले आणि संजय राऊत यांच्यात भरल्या बैठकीत प्रचंड वाद झाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.

विदर्भात आमची जास्त ताकद असून ठाकरे गटाने इथे पाऊल टाकू नये, हीच भूमिका पटोलेंनी घेतली. ज्यामुळे पटोले बैठकीतून तात्काळ बाहेर पडले. एवढेच नव्हे, तर पटोले आणि राऊतांत आरे-तुर्‍यावर खडाजंगी झाल्याचेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाची राजकीय स्वार्थाची भूमिका प्रदेश काँग्रेसला मान्य नसून वर्तमान स्थितीत अस्तित्वाच्या आधारावर प्रत्येक नेते जागावाटपाचा करत असलेला आग्रह हाच अंतर्गत कलहाचा भाग असून कुठल्याही क्षणी ठाकरे गटाचा काँग्रेससोबत काडीमोड होऊ शकतो. परिणामी स्वतंत्र निवडणूक उद्धव ठाकरे गटाला लढवावी लागेल, असा दावा भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. पटोले आणि राऊत यांच्यात शाब्दिक चकमक नव्हे, तर एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचेही बैठकीत घडले असावे. माध्यमांच्या समोर केवळ बैठक वाद झाल्याची अपुरी चर्चा आल्याचेही कुलकर्णी यांनी म्हटले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.