सध्याच्या राजकारणाबाबत गडकरींनी केलेल्या विधानामुळे उडाली खळबळ

80

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक जुने जाणते आणि अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. पण गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. सध्याचं राजकारण हे केवळ सत्ताकारण झाले असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचाः ‘जरा Sensible माणसाबद्दल विचारा’, फडणवीसांचा राऊतांना सणसणीत टोला)

सध्याचं राजकारण हे सत्ताकारण

राजकारण या शब्दाबाबत सध्या मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या शब्दाचा अर्थ आता ख-या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे आणि सत्ताकारण आहे. जुन्या काळात ज्या राजकीय परंपरेने काम करण्यात आलं ते राजकारण समजाकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण होतं. पण सध्याचं राजकारण हे केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे.

मी गिरीश गांधींना अनेकदा म्हणायचो की राजकारण करू नका, मला खूप वेळा वाटते राजकारण केव्हा सोडायचे, केव्हा नाही, राजकारणापेक्षा अनेक गोष्टी जीवनात आहेत ज्या करण्यासारख्या आहेत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.