‘वेदांता प्रकल्प’ महाराष्ट्रात होताच कधी?, ‘या’ प्रकरणाची चौकशी व्हावी, शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

100

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान गुरूवारी भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार, म्हणाले…)

काय म्हणाले शेलार

वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. जी विधाने केली जात आहे. त्याने महाराष्ट्रातून जनतेच्या मनात पेंग्विन सेनेच्या माध्यमातून भ्रम पसरवले जात आहे. म्हणून त्यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून गुरूवारी वेदांता गुजरातमध्ये नसल्याची टीका करण्यात आली आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी, सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी, पेंग्विनसेना प्रमुखांनी याचे उत्तर द्यावे, महाराष्ट्रात भ्रम पसरवण्याचे काम पेंग्विन सेनेच्या माध्यमातून होतोय, असा आरोप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

ते पुढे असेही म्हणाले की, वेदांता प्रकल्प गुजरातला खेचून नेला गेला. याचा अर्थ असा की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. मग हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू कधी झाला, या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का, सवलती दिल्या होत्या का, करारनामा कधी झाला, प्रकल्पासाठी जागा दिली होती का, असे कित्येक प्रश्न शेलारांनी या परिषदेत उपस्थित केले आहे.

शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावेळी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शेलार यांनी असे म्हटले की, आता आम्ही खोटं सहन करणार नाही. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जर पेंग्विन सेना देणार नसेल तर माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की, या विषयावर उच्च स्तरीय चौकशी केली गेली पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.