अडीच वर्षे झाली आता सरकारबाबत विचार करावा लागेल! बाळासाहेब थोरातांचा इशारा

117

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार १९ मते कमी असूनही भाजपने तो उमेदवार निवडून आणला. यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, सरकारला आता अडीच वर्षे झाली आहे, त्यामुळे सरकार म्हणून याचा विचार करावा लागेल, आम्ही आमच्या भावना हायकमांडला कळवणार आहे, असे सांगत थोरात यांनी सरकार पाडण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

पक्षश्रेष्ठींना कळवणार  

आमची मते फुटली हे आम्ही नाकारत नाही, आम्ही कोणत्याही पक्षाला दोष देत नाही कारण आम्हाला आमची पहिल्या पसंतीची मते मिळाली नाही, त्यामुळे याचा आम्हाला अधिक विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आधी आम्ही आमचा दोष पाहत आहोत, मात्र तरीही सरकार म्हणून आत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची गरज आहे, असेही थोरात म्हणाले. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. मी या निवडणुकीविषयीच्या माझ्या भावना पक्षश्रेष्टींना कळवणार आहे. खरेतर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची मते ठरवली होती मात्र भाई जगताप यांनी त्यांच्या मैत्रीच्या जोरावर अन्य पक्षातील मते मिळवली आहेत, असेही थोरात म्हणाले.

(हेही वाचा भाजपची बहुमताकडे वाटचाल! विधानसभेत १३३ आमदारांचे मताधिक्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.