विधान परिषद निवडणूक : भाजप सतर्क, मोर्चेबांधणीला सुरुवात

106

विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि विरोधी पक्ष भाजप हे सगळे जण आपापले आमदार सुरक्षित रहावेत, यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत . याकरता या पक्षांनी हॉटेल डिप्लोमॅसी सुरु केली आहे. जरी राज्यसभेत भाजपची सरशी झाली तरी विधान परिषद निवडणुकीत याकरता भाजप सतर्क झाली आहे. भाजपने त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे जशी भाजपनेही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तशी महाविकास आघाडीच्या पक्षांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे.

सगळ्या पक्षांची हॉटेल डिप्लोमॅसी 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने ५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत. मात्र यातील काँग्रेसच्या दुसऱ्या जागेसाठी आणि भाजपने त्याकरता उभ्या केलेल्या ५व्या जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. त्याकरता आमदार फोडाफोडी होणार हे निश्चित आहे. भाजपने या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याकरता भाजपने प्रत्येक नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली आहे. हे आमदार त्यांच्या त्यांच्या विभागातील स्वतःच्या आमदारांवर लक्ष ठेवणारच शिवाय दुसऱ्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने शिवसेनेनेही सर्व आमदारांना १८ जून रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना पवईतील रेडिसन या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर भाजपही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील हॉटेल डिप्लोमॅसी करणार आहे.

(हेही वाचा ‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था, सुरक्षा यांना धोका! हिंदु राष्ट्र अधिवेशनातील सूर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.