सर्वपक्षीय हॉटेल डिप्लोमॅसी! राऊत म्हणतात, गावाकडच्या आमदारांना इथे कधी रहायला मिळणार! 

76

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ नयेत म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या सगळ्या पक्षांनी त्यांच्या त्यांच्या आमदारांना त्यांनी ठरवलेल्या हॉटेलांमध्ये ठेवले आहे, यावर शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलताना पुन्हा आमदारांचा अवमान होईल असे वक्तव्य करून बसले, गावाकडच्या आमदारांना इथे कधी राहायला मिळणार, असा आशयाचे त्यांनी विधान केले.

याआधी अपक्ष आमदार झालेले नाराज 

याआधी राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, त्याला अपक्ष आमदार कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांची नावेही त्यांनी केली. त्यात अपक्ष आमदार भुयार यांचेही नाव घेतले. त्यावर आमदार भुयार यांनी आक्षेप घेतला होता. अपेक्षांचे गुप्त मतदान असतानाही राऊत यांना आपले मतदान कसे समजले असा सवाल आमदार भुयार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर राऊत यांना यावर सारवासारव करावी लागली होती. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार तयारी सुरु आहे. हॉटेल फोर सीझन येथे काँग्रेसचे आमदार आहेत, ताज हॉटेलमध्ये भाजपचे आमदार आहेत, हॉटेल इन मध्ये शिवसेनेचे आमदार आहेत तर राष्ट्रवादीनेही त्यांच्या आमदारांना हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवले आहे. असा वेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी गावाकडच्या आमदारांना अशा मोठ्या हॉटेलांमध्ये कधी राहायला मिळणार, असे सांगत हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो, असे म्हणाले. मात्र ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत चांगल्या हॉटेलमध्ये राहणे परवडत नाही, असा अर्थ संजय राऊत यांच्या वक्तव्यातून निघत असल्याने राऊत यांच्यामुळे आता ग्रामीण भागातील आमदार नाराज होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा मत बाद झाले, तर याद राखा! शिवसेनेने आमदारांना दिला दम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.