वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबाबत CM Devendra Fadnavis काय म्हणाले?

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. याला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे.

107

रायगडावडील वाघ्या कुत्र्याची समाधी तोडावी, अशी मागणी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद वाढला आहे. हा विषय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत पोहचला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाची भूमिका घेतली.

ही समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. याला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरिता पैसे होळकरांनी दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे. इतके वर्ष झाले त्या ठिकाणी तो वाघ्याच्या पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का?” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

(हेही वाचा “पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय हुशार व्यक्ती”; Donald Trump यांनी प्रशंसा करत आयात शुल्काबाबत दिला इशारा)

वाद करण्याचे काही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसता. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असे काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणे अयोग्य आहे, बसून मार्ग काढला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.