कोकणातून युतीचे मनोमिलन होणार?

कोकणातले वैर संपवून नव्या युतीची नांदी तर होत नाही ना?, असा प्रश्न आता दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पडला आहे.

85

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला अन् भाजपला विरोधी बाकावर बसवले. एक दोन नव्हे तर तब्बल २५ वर्षांहून जास्त काळ असलेली युती शिवसेनेने तोडली. मात्र आता याच शिवसेना-भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील आणि राज्यात सरकार स्थापन करतील, अशी चर्चा आता चांगलीच रंगली आहे. तसे संकेतच मिळत असून, युतीचे मनोमिलन कोकणातून होते की काय, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

कोकणातले वैर संपले?

नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. तळ कोकणात तर राणे-समर्थक आणि शिवसैनिक नेहमीच एकमेकांना भिडत असतात. मात्र आता कोकणातील शिवसेना आणि राणेंमधील वाद कुठेतरी मिटताना दिसत असून, हे युतीचे संकेत तर नाहीत ना? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. वेंगुर्ल्यातल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला आणि यात कधी नव्हे ते नारायण राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत, शिवसेना आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर हे एकाच व्यासपिठावर बसले. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबरही एकत्र येण्याची वेळ आली आणि पक्ष नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू, असे म्हणाले. यामुळे कोकणातली वैर संपवून नव्या युतीची नांदी तर होत नाही ना? असा प्रश्न आता दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पडला आहे.

(हेही वाचाः सोबत राहून पाठीत सुरा खुपसणार असाल तर… मित्र पक्षांवर नानांचा पुन्हा घणाघात)

राऊत नितेश राणेंना म्हणाले…

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकमेकांवर अतिशय खालच्या भाषेत टीका करणारे विनायक राूत आणि नितेश राणे हे दोन्ही नेते व्यासपिठावर मात्र एकमेकांसोबत हसताना देखील दिसले. कणकवली वैभववाडीचे लोकप्रिय आमदार नितेश राणे असा उल्लेख करत राऊतांनी चक्क नितेश राणेंचा खांदा थोपटला. नंतर ते स्वत: भाषणाला उभे राहीले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.