भारत-बांगलादेश (India-Bangladesh) सीमेवर दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या १३ महिन्यात भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ हजार ६०१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दि. १२ मार्च रोजी राज्यसभेत दिली. तसेच दिल्ली पोलिसांनी आग्नेय आणि दक्षिण दिल्लीतून केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशींना (Bangladeshi) अटक केली. हे सर्वजण बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते.
( हेही वाचा : “पुढची मुंबई पालघरमध्ये…” ; CM Devendra Fadnavis यांचं विधान)
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी एका लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान या २,६०१ बांगलादेशींना अटक करण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने (Border Security Force) जानेवारी २०२५ मध्ये १७६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. डिसेंबर २०२४ मध्ये २५३ नोव्हेंबरमध्ये ३१०, ऑक्टोबरमध्ये ३३१, सप्टेंबरमध्ये ३००, ऑगस्टमध्ये २१४, जुलैमध्ये २६७ आणि जूनमध्ये २४७ जणांना अटक करण्यात आली असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. मे २०२४ मध्ये सर्वात कमी ३२ घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ९१, मार्चमध्ये ११८, फेब्रुवारीमध्ये १२४ आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये १३८ जणांना अटक करण्यात आले आहे. (India-Bangladesh)
दरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षा वाढवली असल्याची माहिती गृह राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे. तसेच सरकारने सीमेवर देखरेख, मनुष्यबळ आणि तांत्रिक बाबींमध्ये वाढ केली असून याद्वारे भारत-बांगलादेश (India-Bangladesh) सीमा सुरक्षा मजबूत केली आहे. सीमेवर सतत गस्त, नाकाबंदी, निरीक्षण चौक्या यामुळे ही या कारवाया करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (Border Guard Bangladesh) सोबत संयुक्त ऑपरेशन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नाईट व्हिजन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, आयआर सेन्सर्स सारखी देखरेख उपकरणे सीमेवर असल्याचे त्यांनी सांगितले. (India-Bangladesh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community