राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; ११ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू

89

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून अकरा दिवसांत राज्यात सतरा रुग्णांनी स्वाईन फ्लूमुळे आपला जीव गमावला. राज्यात सद्यस्थितीत १ हजार १७५ स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती साथरोग विभागाकडून दिली गेली. राज्यात आतापर्यंत ३७ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा : Free Metro Travel : स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना करता येणार मोफत मेट्रो प्रवास!)

३१ जुलैपर्यंत राज्यात स्वाईन फ्लूमुळे राज्यात २० जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या अकरा दिवसांत १७ रुग्णांनी जीव गमावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सर्वात जास्त रुग्णसंख्या पुणे आणि मुंबईत आढळत आहे. एकट्या पुणे शहरांत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २२३ वर पोहोचली आहे. पुण्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड, ठाणे आणि कल्याणमध्येही प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्याखालोखाल ठाण्यात २२३, मुंबईत २२१ स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. अकोला आणि औरंगाबादमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साता-याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरीहून कोल्हापूरात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रपूरातील एका नागरिकाचाही मृत्यू नागपूरात झाल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीत आढळले.

स्वाईन फ्लूचे आतापर्यंतचे जिल्हानिहाय मृत्यूची आकडेवारी

जिल्हा – मृत्यूची संख्या

  • पुणे मनपा – ११
  • पिंपरी-चिंचवड मनपा – २
  • ठाणे मनपा – ४
  • कल्याण – १
  • ठाणे मनपा – ४
  • कोल्हापूर – ९
  • नाशिक – ४
  • नागपूर – ४
  • ठाणे, रायगड – प्रत्येकी १

स्वाईन फ्लू हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात पसरतो. पावसाळ्यात सुद्धा स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळतात समशितोष्ण कटिबंधात हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामान असलेल्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात.

स्वाईनफ्लूच्या आजाराची लक्षणे –

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात

स्वाईन फ्लू आजाराच्या प्रसाराचे माध्यम व निदान –

इन्फ्लूएन्झा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होतो. हवेच्या माध्यमातून स्वाईन फ्लू पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून तसेच खोकल्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून निरोगी व्यक्तीकडे जातात.

आरटीपीसीआर तपासणीतून राज्यातील तीन आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मुंबईतील हाफकिन संशोधन संस्था तसेच कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध आहे.

उपचार –
ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.

काय टाळाल…
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका

प्रतिबंधात्मक उपाय –
वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.