एकाच दिवशी राज्यात ४७० रुग्ण

96
बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाची बाधा झालेले तब्बल ४७० रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यात आता विविध भागांत २ हजार १७५ रुग्ण उपचाराधीन आहेत.
दिवसभरात ३३४ रुग्णांना कोरोनावर यशस्वी उपचारानंतर घरी सोडले गेले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र कोरोना रुग्णांचा आकडा कित्येक दिवसांपासून शून्यावर कायम असल्याने, आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला.
वाढत्या रुग्णसंख्येत अखेरीस ठाण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला. ठाण्यात आता २०५ रुग्ण  उपचाराधीन आहेत. मुंबईत १ हजार ५३१ तर पुण्यात २८८ रुग्णांवर  उपचार सुरु  असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. रुग्णसंख्या वाढल्यापासून सुरुवातीपासूनच मुंबईसह पुणे आणि ठाण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.