मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

अतिवेगात आलेल्या कारने मालवाहू ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.

100

मुंबई-पुणे महामार्ग हा आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कारण या महामार्गावर अपघातांची संख्या वाढतच आहे. या महामार्गावर तर या आधी राजकीय पुढारी आणि सिनेसृष्टीतील काही जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. असाच आणखी एक अपघात पुन्हा या महामार्गावर झाला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले. यावरुन हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. मुंबईवरून येणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अतिवेगात आलेल्या कारने मालवाहू ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचा दर्शनी भाग ट्रकच्या मागील बाजूस पूर्ण घुसल्याने कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले. तर कारचा चक्काचूर झाला आहे. ही घटना उर्से टोल नाक्याजवळील 82 किलोमीटरवर घडली. अपघातानंतर घटनास्थळी शिरगावं परंदवडी पोलीस, देवदूत रेस्कु टीम आणि आयआरबी कर्मचारी दाखल झाले, ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली.

(हेही वाचा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मुसलमान काढायचा महिला, मुलींचे व्हिडिओ; प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.