भारतातील आघाडीचा व्यावसायिक समूह अदानी (Adani Group) यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी आसाममध्ये (Assam) ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही व्यावसायिक गटाने केली नाही इतकी मोठी गुंतवणूक अदानी समूहाने केली आहे. ही गुंतवणूक विमानतळ, शहर गॅस वितरण, वीज पारेषण, सिमेंट आणि रस्ते प्रकल्पांमध्ये केली जाईल. यामुळे राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि रोजगाराला चालना मिळेल.
( हेही वाचा : BEST Contract Workers Strike : कंत्राटी कामगारांच्या मोर्चामुळे बेस्ट प्रवाशांचे हाल; १९६९ पैकी १३९१ बसेस धावल्या रस्त्यावर)
गुवाहाटी (Guwahati) येथे झालेल्या अॅडव्हान्टेज आसाम २.० इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर समिटमध्ये (Advantage Assam 2.0 Investment and Infrastructure Summit) अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अदानी समूह राज्याची वाढती ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी आसाममध्ये अणुऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आर्थिक दृष्टिकोनाचेही कौतुक केले. (Assam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community