मुंबईकरांनो, हातचे राखत पाणी वापरा;एवढ्याच दिवसाचे आहे तलावांमध्ये पाणी

98

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये तसेच तलावांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १४ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. सध्या सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैंकी २० हजार २६९ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैपर्यंत पाण्याचा साठा पुरेल एवढा पाणी साठा असून मागील वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले होते आणि ऑगस्टपर्यंत तलाव क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे यंदाही उशिरावर गेलेल्या पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावून पाण्याची पातळी न वाढवल्यास मुंबईकरांवर पाणीकपात लादली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या काही दिवसांमध्ये हातचे राखत पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

( हेही वाचा : पुढचे १५ दिवस माहिम रेल्वे स्थानकावर नो लोकल हॉल्ट)

मुंबईला दरदिवशी अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असून १० जून २०२२ पर्यंत यासर्व धरणांमध्ये एकूण २० हजार २६९ कोटी लिटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत अर्धा ते एक टक्का अधिक पाणी साठा असला तरी हा पाणी साठा ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. परंतु एरव्ही हा पाण्याचा साठा काही प्रमाणांत पुरेसा असला तरी मागील काही वर्षांपासून पावसाची हजेरी खऱ्या अर्थाने जुलै महिन्यांमध्ये लागते. त्यातच नाशिक किंवा तलाव क्षेत्रात पाऊस न झाल्यास धरण तसेच तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे तलाव क्षेत्रात पाऊस न झाल्यास विलंबाने होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. परिणामी पावसाचा अंदाज घेऊन जुलैच्या १५ नंतर पाणी कपात जाहीर करावी लागण्याची शक्यता आहे,असे बोलले जात आहे. तुर्तास कोणतीही कपात करण्याचा विचार नसला तरी वर्षभराच्या पाण्याचे नियोजन पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाने जर तलाव क्षेत्रात हजेरी लावल्यास ही कपातही करण्याची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजचे असून यासाठी पाण्याचा वापर काही प्रमाणामध्ये जपून करण्याची गरज असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकूण आवश्यक पाणी साठा :

१लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर( १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष)

१० जूनची मागील तीन वर्षांतील पाण्याच्या पातळी

सन २०२२ : २० हजार २६९ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १४ टक्के)

सन २०२१ : १८ हजार ३५५ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १२ टक्के)

सन २०२०: १९ हजार ७३४ कोटी लिटर ( एकूण साठ्याच्या १३ टक्के)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.