मुंबईकरांनो, पाणी कपातीला व्हा तयार, तलाव साठा केवळ १० टक्केच!

130

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये तसेच तलावांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. सध्या सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर जो एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असून जर पावसाने मेहेरबानी केल्यास हे जलसंकट टाळले जाऊ शकते. परंतु सध्या तरी मुंबईकरांसमोर हे पाणी कपातीचे संकट दिसून येत आहे.

( हेही वाचा : BMC Election 2022: दादर-माहिम आणि धारावीत काय आहे स्थिती, जाणून घ्या!)

मुंबईला दरदिवशी अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असून २० जून २०२२ पर्यंत यासर्व धरणांमध्ये एकूण १५ हजार १२३कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक होता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत

सर्वाधिक कमी असलेला हा पाणी साठा असून २०२१ मध्ये या २० जून पर्यंत १४ टक्के तर २०२० मध्ये ११ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे मागील तीन वर्षांतील सर्वात कमी पाणी साठा असून पुढील आठ दिवसांमध्ये तलाव क्षेत्रात साठा ना वाढल्यास कपात जाहीर करावी लागणार असल्याची शक्यताआहे. त्यामुळे या पाणी साठ्याचा आढावा घेऊन लवकरच पाणी कपात जाहीर होण्याची शक्यता आहे. एरव्ही मे महिन्यात पाणी साठ्याचा आढावा घेऊन कपात लागू करणारे महापालिका प्रशासन हे केवळ आगामी निवडणूक डोळ्यासमोर कपात जाहीर करण्यास विलंब करत असल्याची माहिती मिळत आहे.

एकूण आवश्यक पाणी साठा :

  • १लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर( १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष)
  • २०जूनची मागील तीन वर्षांतील पाण्याच्या पातळी

सन २०२२ : १५ हजार १२३कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १० टक्के)

सन २०२१ : २०हजार ४९८ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १४ टक्के)

सन २०२०: १५ हजार ८७० कोटी लिटर ( एकूण साठ्याच्या ११ टक्के)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.