अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद, पीडित तरुणीचे बळजबरीने लावले लग्न

92

अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहाद आंतरधर्मीय विवाहाचे रोज नवीन प्रकरण समोर येत आहे. सहा महिन्यांपूर्वी मेळघाटातील धारणी येथील 23 वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून तिला हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त केले, तसेच गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली जात होती, असा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी आईला फोनवरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून तिला घरी आणले. आता सदर तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.

(हेही वाचाः अमरावतीतील तरुणीच्या हत्येवर लव्ह जिहादचं सावट, अनिल बोंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)

कारवाईची मागणी

या युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीची हलगर्जी केली असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबीयांवर कारवाई करून त्यांना अटक करावी व मुलीचा शोध न घेणाऱ्या धारणी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.