शुक्रवारी, 3 मार्चला मुंबईत होणाऱ्या गड-दुर्ग रक्षण महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा; रणजित सावरकर यांचे आवाहन

113

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग! मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्यांच्याकडे आज लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे, यांसाठी स्वतंत्र गड-दुर्ग महामंडळाची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी, ३ मार्च रोजी मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे.

मेट्रो आयनॉक्स सिनेमा येथून या मोर्च्याची होणार सुरुवात 

राज्यातील अनेक गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा जपायचा असेल, तर गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे तातडीने हटवायला हवीत. एकूणच गड-दुर्गांची संख्या, अतिक्रमणांची व्याप्ती, संवर्धनाची आवश्यकता हे सर्व पहाता गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे, यासाठी राज्य सरकारने गड-दुर्ग महामंडळाची स्थापना करण्याची नितांत आवश्यकता बनली आहे. यासाठी मुंबईत गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे रणजित सावरकर म्हणाले. शुक्रवार, 3 मार्च या दिवशी दुपारी 12 वाजता मेट्रो आयनॉक्स सिनेमा येथून या मोर्च्याची सुरुवात होणार असून मोर्च्याचा शेवट आझाद मैदान येथे होणार आहे. या मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे 25 हून अधिक वंशज, यांसह विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही रणजित सावरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.