मोदी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट

90

देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. राज्य सरकारकडून तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांनी नियमित परतफेड केली तर शून्य टक्के व्याजदर आहे. दरम्यान आता केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर १.५ टक्के सूट देण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत ३४ हजार ८५६ कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : 5 वर्षांखालील मुलांना ट्रेनचे तिकीट काढावे लागणार? रेल्वेने दिले हे स्पष्टीकरण)

३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबवल्या जात असताना आता सरकराने ३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट दिली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळेल, तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन शेतीचे आधुनिकीकरण होईल असे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांमुळे मदत होतेच परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार कमी होईल असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.