सरकारी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पुन्हा अनिवार्य!

112

कोरोनाकाळात विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीवर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु आता कोरोनाविषयक निर्बंध मागे घेण्यात आले असून राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये कार्यालयातील सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच घ्यावी असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने सर्व कार्यालयांसाठी प्रसारित केले आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात २ हजार १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार!)

बायोमेट्रिक अनिवार्य

बायोमेट्रिक उपस्थिती पुन्हा सुरू करून, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ऐच्छिरित्या सुरू ठेवण्यात याव्यात आणि सर्व शासकीय कार्यालयांनी अधिकारी-कर्मचारी त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवत आहेत का याची खबरदारी घ्यावी असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या माहिती तंत्रज्ञान उपविभागाने शासकीय कार्यालयांतील सर्व ठिकाणांची बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू राहण्याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.