गणेशोत्सवाकरता कोकणात जाणा-यांसाठी शेलारांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवदेन देत ही मागणी त्यांनी केली आहे.

71

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकरता सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या पूर्णपणे भरल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने कोकणात जाण्यासाठी अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवदेन देत ही मागणी त्यांनी केली आहे.

अनेक जण प्रतीक्षा यादीत

कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली. या गाड्यांचे बुकिंग सुरू होताच, काही दिवसांतच हे बुकिंग पूर्ण झाल्याने बरेच जण अद्याप प्रतीक्षा यादीतच आहेत.

चाकरमान्यांसाठी गाड्या वाढवा

दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून, 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांच्या ज्यादा बुकिंगसाठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजून काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.