बैलगाडा शर्यत रद्द, कारण…

99

राज्यातील बैलगाडा शर्यतीचे निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले असले तरी राज्यातील सर्वाधिक प्रसिद्ध नाशिक येथील बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. त्यामुळे राज्यभरातील बैलगाडा शर्यतीसाठी उत्साही असलेल्या बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला आहे.

खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेली शर्यत 

राज्यात सध्या जनावरांना लॅम्पी हा रोग जडला आहे. या रोगामुळे राज्यातील शेकडो जनावरे संसर्गित झाले आहेत. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यूही होते आहे. त्यामुळे नाशिक येथील ओझर येथे आयोजित बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. दरवर्षी नाशिक येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा यात्रेचे भव्य आयोजन करण्यात येत असते. मात्र बैलगाडा शर्यत रद्द झाल्याने राज्यभरातून येणाऱ्या बैलगाडा शर्यत रसिकांचा हिरमोड झाला आहे. सध्या राज्यभरात विशेषतः नाशिक जिल्ह्यात लॅम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे, त्यामुळे या शर्यतीला राज्य सरकारने ओझर येथील बैलगाडा शर्यतीत परवानगी नाकारली आहे. ज्या वेळी लॅम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल, त्यानंतर राज्य सरकारच्या रितसर परवानगीने यात्रा समितीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येईल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

(हेही वाचा IFFY 2022 : नदव लॅपिड यांना उपरती; म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा उत्कृष्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.