मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय

92

मध्य रेल्वे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे विलंबाने धावत असून मंगळवारीही सकाळी ११:३० पासून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गाड्या उशिराने धावत असल्याची घोषणा ठाणे आणि रेल्वे स्थानकांमध्ये करण्यात येत आहे. अलिकडे दरदिवशी लोकल सेवा विस्कळीत होऊन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे.

( हेही वाचा : देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता ‘आभा हेल्थ कार्ड’; ऑनलाईन करा नोंदणी )

मध्य रेल्वे विस्कळीत 

मंगळवारी सकाळी ११:३० पासून मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. स्थानकांमधील प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढत जाऊन रोज मध्य रेल्वे विस्कळीत होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवरात्रोत्सवात विविध ठिकाणी प्रवासी देवीच्या दर्शनाला जातात. लोकल उशिराने धावत असल्याने सर्वच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.