देशात बालविवाहांच्या संख्येत वाढ, 22 कोटींहून अधिक बालिका वधू

111

बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे देशात चालू आहे. ही प्रथा नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या 5 वर्षांत देशात बालविवाहामध्ये तिप्पटीने वाढ झाली असून भारतात 22 कोटींहून अधिक वधूंचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे समजत आहे.

बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कायदेशीर प्रयत्न देखील केले असून मुलींचे लग्नाचे वय हे 18 वर्षे आणि मुलांचे वय हे 21 वर्षे करण्यात आले आहे. पण तरीही आज बालविवाहासारख्या घटना घडत आहेत. लग्नासाठी अपहरण करुन नेण्यात येणा-या मुलींपैकी भारतात दररोज सरासरी 35 मुलींची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा

नॅशनल क्राईण रेकॉर्ड ब्यूरो(NCRB)च्या आकडेवारीनुसार 2012 ते 2021 या 10 वर्षांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत 4.5 हजारांहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यापूर्वीपासून भारतात बालविवाहविरोधी कायदा करण्यात आला आहे. 1929 पासून हा कायदा देशात अस्तित्वात आहे. 1929 मध्ये मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे तर मुलींचे वय 14 वर्षे होते. त्यानंतर या कायद्यात बदल करण्यात येऊन 1978 मध्ये मुलांचे लग्नाचे वय 21 तर मुलींसाठी संमती वय 18 वर्षे करण्यात आले आहे.पण तरीही या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.