पूरग्रस्तांना मदत देण्यावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री?

114

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले, तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

काही कटू निर्णय घ्यावे लागतील

सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पलूस तालुक्यातील भिलवडी येथे आले होते. त्यावेळी कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर केले गेले. लोकांचे जीव वाचवण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. शेती, घरेदारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू असून, काही ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, त्याकरिता आपली तयारी हवी. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः सेनेची मराठी अस्मिता जागी झाली हो!!!)

पॅकेज देणार नाही, पण…

नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही, तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे-जे आपल्या हिताचे आहे ते सर्व राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली निवेदने द्या, त्यांतील सूचनांचा नक्कीच विचार करू, अशी ग्वाही त्यांनी पूरग्रस्तांना दिली. भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अंकलखोपच्या दिशेने रवाना झाला. येथेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी आत्मियतेने संवाद साधत शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.