महाराष्ट्र पुन्हा गारठणार !

106

राज्यात काही दिवसांपासून थंडीने जरा विसावा घेतला होता पण, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र गारठणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ग्रामीण भागात, तर अक्षरश: थंडीने कहरच केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली.

दिवसभर वातावरणात गारवा 

रविवारी काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान हे 10 अंशांखाली गेले असून, जळगावात 5 अंश सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणच्या किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार आहे. यामुळे रात्री किंवा पहाटेच नव्हे, तर दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याची माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

( हेही वाचा: फेब्रुवारी महिन्यात ७ दिवस बँका बंद, पहा संपूर्ण वेळापत्रक )

काळजी घेण्याचे आवाहन

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमान हे 10 अंशांखाली गेले असून, जळगावात तर 5 अंश सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.