धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांची अशीही बनवाबनवी

103

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. येथे रायपूर गावात काही लोकांवर एका कुटुंबातील सदस्यांना पैशाचे आमिष दाखवून ख्रिश्चन बनवल्याचा आरोप आहे. धर्मांतर केल्यानंतर पैसे दिले नाही. या संदर्भात बजरंग दलाच्या सदस्यांनी रविवारी, 1 जानेवारी मिर्झापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक हरीश कौशिक यांनी केलेल्या तक्रारीत काही लोकांनी 3 लाख रुपयांचे आमिष दाखवून जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास लावल्याचा आरोप केला.

हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

रायपूर गावात हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा कळले की, तेथे काही लोकांनी हिंदू कुटुंबातील लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दिला. हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या पाद्र्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली.

(हेही वाचा छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच; संभाजी राजे यांचा अजित पवारांना विरोध)

पैसे घेतल्यास येशूला राग येईल 

मिर्झापूर पोलीस ठाण्यांतर्गत रायपूर गावात राहणाऱ्या योगेश आणि त्याच्या बहिणीला पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीने पत्रात म्हटले आहे. सुनीताला काही जणांना मंजूच्या घरी जाऊन भेटायचे होते. मंजूचा पती शादीराम याने दोघांना तीन लाख रुपयांचे आमिष दाखवून धर्म बदलण्यास सांगितले. दोन्ही आरोपी पती-पत्नीने भाऊ-बहिणीला सुरेंद्र प्रसाद आणि हरी सिंह भेटायला लावले. त्यानंतर चौघांनी मिळून पीडितेचे धर्मांतर करून घेतले, त्यानंतर पीडितांनी पैसे मागितल्यावर जर तुम्ही पैसे मागितले तर येशू ख्रिस्ताला राग येईल. तुमची काहीच किंमत राहणार नाही, असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.