रेल्वे प्रवाशांना पुन्हा मिळणार गरमा-गरम जेवणाची मेजवानी!

86

कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षी रेल्वेमध्ये शिजवलेले अन्न विक्री ही सेवा भारतीय रेल्वेने बंद केली होती. शुक्रवारी ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. एक वर्षापूर्वी बंद झालेल्या रेल्वे गाड्या काही दिवसांपूर्वी पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सध्या राजधानी, शताब्दी आणि इतर गाड्यांमध्ये फक्त पॅकेज केलेले ‘रेडी टू इट’ अन्न उपलब्ध केले जात होते.

मागणीनुसार मिळणार जेवण

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) खाद्य परवानाधारकांसाठी नव्या निविदा पुन्हा जारी करणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जेवण तयार केले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार, तसेच विभागीय रेल्वे पोहे, पराठा, राजमा आणि उपमा यांसारख्या तयार जेवणाला प्रवाशांची फारशी पसंती मिळाली नाही. रेल्वे वापरकर्त्यांनी सूचित केल्यानुसार प्रवासी शिजवलेले जेवण पसंत करू शकतील. त्यामुळेच १ डिसेंबर पासून रेल्वेत पूर्ववत शिजवलेले जेवण मिळणार आहे.

( हेही वाचा : कोरोनानंतर सरकारी शाळांना अधिक पसंती! )

शिजवलेल्या अन्नाची सेवा पुन्हा सुरू

सामान्य रेल्वे सेवा पुनर्संचयित करणे, प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा आणि देशभरातील भोजनालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अशा इतर ठिकाणी कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल झालेले आहेत. म्हणूनच रेल्वे मंत्रालयाने शिजवलेल्या अन्नाची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे, रेल्वे मंत्रालयाच्या आदेशात नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.