सहा महिन्यांनंतर कमी होतो लसीचा प्रभाव, AIIMS चा खुलासा

124

नवीन वर्षात आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या महिन्याभरापासून सातत्याने वाढत असताना दिसत आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे. पण आता लसीकरणाबाबत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेने एक धक्कादायक खुलासा केल आहे. सहा महिन्यांनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस जास्त प्रभावी ठरत नसल्याचे एम्सच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांनंतर कमी होतो प्रभाव

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. पण या लसीचा प्रभाव सहा महिन्यांनंतर कमी होत असल्याचे एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. एका संशोधनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इतका असतो प्रभाव

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये सुरुवातीचे दोन आठवडे ते तीन महिने या कालावधीत ओमायक्रॉनसारख्या विषाणूशी झुंजण्याची क्षमता जास्त असते. या कालावधीत लसीचा प्रभाव हा 52.2 टक्के इतका असतो. पण त्यानंतर हा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपल्या आरोग्य कर्मचा-यांवर एम्सने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. एकूण 11 हजार 474 आरोग्य कर्मचा-यांवर एम्सद्वारे ही चाचणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.